चिमुकल्याच्या हट्टापायी एका मुस्लीमधर्मियांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले. अस्लम आणि अर्शिया जमादार या दाम्पत्याने आपल्या चिमुकल्याचा हट्ट पुरवला आणि घरात क्यूट बाप्पाची प्रतिष्ठापना आणि आरतीची झाली. हा प्रसंग गणेश चतुर्थीला उस्मानाबादमधील कळंब इथे घडला.
अस्लम शेख यांनी फेसबुक पोस्टद्वारे हा संपूर्ण प्रसंग कथन केला आहे. त्यांच्या तीन वर्षांच्या चिमुकल्याने अब्रारने अम्मीकडे गणपती आणायचा हट्ट धरला. अर्शिया यांनी ड्यूटीवर असलेल्या अस्लम जमादार यांना याबाबत सांगितलं. त्यानंतर घरात बाप्पांचं आगमन झाल्याचा फोटोच अर्शिया यांनी अस्लम जमादार यांना पाठवला. घरात बाप्पा आल्याने अब्रार अतिशय खूश आहे.
अस्लम शेख यांनी फेसबुकवर लिहिलंय…
“आज दुपारी ग्रामीण भागात कामानिमित्त गस्तीवर असताना बायकोचा फोन आला. माझा मुलगा अब्रार गणपती आणायचा म्हणून हट्ट करतोय आणि खूप रडतोय अस तिचा निरोप. आधी हसू आलं ऐकून. मुसलमानांच्या घरी गणपती हा विचार माझ्या डोक्यात… मागच्या वर्षी मी, रवी, बाबळे सर सोबत आमची चिमुकली मुले बाबळे सरांचा गणपती आणायला गेले होते. यावर्षी रवी आणि बाबळे सर बदलून गेले त्यामुळे गणपती आणायला गेलो नाही. पण त्या लहान लेकराला काय कळतंय मुसलमान काय आणि गणपती काय… लहानपण देगा देवा म्हणतात ते खरंच आहे. मी तिला म्हटलं त्याला सांग मी घरी आलो की आणू गणपती. वेळ मारून नेण्यासाठी तेवढंच काय ते कारणं. मग थोड्या वेळाने बायकोने व्हाट्सएप ला फोटोच पाठवला. श्रींची मूर्ती माझ्या घरी विराजमान झालेली. प्रस्थापित मानसिकतेमुळे जे शक्य होत नाही असं वाटत होतं ते प्रामाणिक निरागसतेनं केलं. संध्याकाळी सर्वांनी सोबत बाप्पाची आरती केली. जर त्याच्या मनात आलं तर बाप्पा मुसलमानांच्या घरी सुद्धा आनंदाने येतो आणि त्याला आणल्यावर आनंद पण सोबत येतो याची आज प्रचिती झाली. अब्रार खूप खुश आहे बाप्पासोबत. आता काय ते फक्त एकच मागणं आहे बाप्पाकडं. तुला स्वीकारायची निरागसता अशीच त्याच्या मनात आयुष्यभर राहू दे. बाप होऊन जेंव्हा विचार केला तेंव्हा मुलाचा आनंद आणि बाप्पाचं माझ्या घरात येणं दोन्ही ही खूप सहजपणे स्वीकारता आलं. आयुष्यात ही सहजता अशीच कायम राहूदे रे बाप्पा.
#गणपती_बाप्पा_मोरया
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…