Man Drowns
गडचिरोली : एका २५ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल (१८ मे) संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास प्राणहिता नदीच्या घाटावर घडली. तो मित्रांसोबत आंघोळीसाठी प्राणहिता नदीपात्रात गेला होता. राहुल नारायण सोयाम (२५) रा.जिमलगट्टा, ता. अहेरी असे मृतक युवकाचे नाव आहे.
राहुल नारायण सोयाम हा युवक आपल्या पत्नीसह सिरोंचा येथे राहात होता. तो सिरोंचा येथे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. काल सायंकाळी तो त्याच्या मित्रांसोबत प्राणहिता नदीपात्रात अंघोळीसाठी गेला होता. तो पाण्यात अंघोळ करण्यासाठी उतरला मात्र, त्यानंतर तो परत आलाच नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधमोहीम राबवली तेव्हा राहुलचा मृतदेह हाती लागला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात काल दिवसभरात चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. काल दुपारी १२ वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील वाघोली घाटावर नाव पाण्यात उलटून सोनी मुखरू शेंडे, समृद्धी ढिवरू शेंडे आणि पल्लवी रमेश भोयर या तीन अल्पवयीन मुलींचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर जिल्ह्याच्या दुसऱ्या भागातील सिरोंचा तालुक्यातील २५ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली.
धक्कादायक : रुग्णालयात उंदराने कुरतडला 19 दिवसांच्या बाळाचा पाय
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर कोणाचा दबाव? ‘त्या’ कथित गोळीबार प्रकरणाचं पुढे काय?
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…