मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी सकाळी नवी दिल्लीहून मुंबईत परतले. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभराने ते सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी जात आहेत.
सरकार स्थापनेबाबत महायुतीची पुढील बैठक शुक्रवारी मुंबईत होणार असल्याचे शिंदे यांनी गुरुवारी रात्री उशिरा नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितले होते. परंतु, मुंबईत आज होणाऱ्या महायुतीच्या दोन्ही बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. आज होणारी शिवसेना आमदारांची बैठकही रद्द करण्यात आली आहे. तथापि, शिवसेनेचे प्रमुख असलेले काळजीवाहू मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावाला भेट देत असून ही बैठक आता रविवारी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…