The body of a person
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे अतिशय दुःखद घटना घडली आहे. अवघ्या पाच दिवसांनी ज्याचे लग्न होणार होते, त्या तरुणाचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला आणि घरातील आनंदाचे वातावरण क्षणात दुःखात बदलून गेले. ही घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास एरंडोल येथे घडली. भावेश संजय महाजन (वय-२५) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरातील रहिवासी संजय विठ्ठल महाजन यांचा मोठा मुलगा भावेश याचा २५ एप्रिल रोजी विवाह होणार होता. बुधवारी सकाळी भावेश गावात राहणारे त्याचे काका ज्ञानेश्वर महाजन यांच्याकडे गेला. नाश्ता करायला जात असल्याचे सांगत भावेश काकांची दुचाकी घेवून गेला. बराच वेळ उलटूनही भावेश परत न आल्याने ज्ञानेश्वर महाजन यांनी भावेशच्या घरी जाऊन चौकशी केली. तेव्हा तो अद्याप घरी आला नसल्याचे भावेशच्या आई वडिलांनी सांगितले.
त्यानंतर सर्वांनी भावेशचा शोध सुरु केला. शोध घेत असताना भावेश धरणगाव रस्त्यावरील सुनील पाटील यांच्या विहिरीत पडल्याचे समजले. त्यानंतर भावेशच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. भावेशला विहिरीतून बाहेर काढून तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…