मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबई, पुणे आणि ठाणे परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येत्या 3-4 दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे.
पुढील तीन दिवस राज्यात अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात सर्वाधिक प्रभाव राहणार असून कोकणातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. उत्तर कोकणात याचा सर्वाधिक प्रभाव राहणार आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील 3-4 दिवसात राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्यामुळे IMD ने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड ह्या चौदा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येथे वेगवान वारे देखील वाहतील.
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…