Farmers should register in large numbers on e-crop survey app
सांगली : ई पीक पाहणी उपक्रमामुळे वस्तुनिष्ठ व अचूक माहिती मिळाल्याने धोरणात्मक बाबींमध्येही अचुकता येईल. त्यामुळे या उपक्रमात सुशिक्षित शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी पेठ येथील शेतकरी शिवाजी बापू माळी यांच्या शेतावर जावून प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी संपत खिलारी, तहसिलदार राजेंद्र सबनिस, तलाठी, शेतकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी तलाठ्यांचे प्रशिक्षण व ॲपचा वापर करताना काही अडचणी येतात का याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्यावतीने सुरु असलेल्या ई-पीक पाहणी ॲपचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक देत त्यांना या उपक्रमाचे महत्त्व सांगितले. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, हे ॲप वापरण्यासाठी अत्यंत सुलभ आहे. या ॲपवर नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना शासनाकडून दिली जाणारी मदत तात्काळ संबंधितांकडे पाठविणे सोईचे होणार आहे. या ॲपवर पीक नोंदणी करताना किंवा पीक नोंदणीसाठी काही अडचण असल्यास ग्रामीणस्तरावरील तलाठी, कृषी सेवक हे मदत करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…