महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंचा ड्रग्जच्या व्यापारात सहभाग, उद्धव ठाकरे पण आरोपी, वकील निलेश ओझांचे सनसनाटी आरोप

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांचे वकील ओझा यांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. दिशाच्या मृत्यूचा पुन्हा तपास करण्याची मागणी करत तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिशाची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी केला आहे. वकील ओझा यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत अनेक गंभीर आरोप आणि दावे केले आहेत.

ओझा म्हणाले कि, दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरे पण आरोपी आहेत. आदित्य ठाकरेंकडून घडलेल्या गुन्ह्यावर पांघरुन घालण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर केला. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासानुसार आदित्य ठाकरेंचा ड्रग्जच्या व्यवसायात सहभाग आहे. याचा तपशील आमच्याकडे आहे, असा गंभीर आरोप ओझांनी केला. ‘आदित्य ठाकरे, दिनो मोरिया यांचं फोनवरील संभाषण यासाठीचा पुरावा आहेत. समीर खान नावाच्या व्यक्तीची डीए ५० नावाची कंपनी आहे. त्याला ड्रग्ज सिंडिकेट प्रकरणात एनसीबीने आरोपी केलं होतं. या कंपनीशी दिनो मोरिया, सूरज पांचोली, आदित्य ठाकरे नियमित संपर्कात असतात. आदित्य ठाकरेंचा ड्रग्ज प्रकरणातील सहभाग समोर आल्यावर एनसीबी आणि समीर वानखेडेंना अटकेची कारवाई करण्यापासून कोणी रोखलं होतं? त्यासाठी किती कोटींची डील झाली होती?, असे सवाल ओझांनी विचारले.

‘दिशा सालियनचा स्टिव्ह पिंटो नावाचा एक मित्र होता. त्यानं काही ट्विट्स केले होते. ७ जून २०२० रोजी एकता कपूरच्या घरी पार्टी झाली होती. त्या पार्टीला परमवीर सिंह, सुशांत, दिशा, आदित्य ठाकरे हजर होते. तिची हत्या कशी झाली याच्या काही हिंट त्यानं दिल्या होत्या. तो स्टिव्ह पिंटो त्या दिवसापासून गायब आहे. त्यामुळे या पोस्ट कोणी लिहिल्या, स्टिव्ह पिंटो कुठे आहे. याचाही तपास व्हावा,’ अशी मागणी ओझांनी केली.

या प्रकरणात दिशाच्या कुटुंबियांना ५ वर्षांनी जाग आली का, असा सवाल करणाऱ्यांनाही ओझा यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘११ डिसेंबर २०२३ रोजी सतीश सालियन यांचा जबाब एसआयटीने नोंदवला. त्यात त्यांनी केस रिओपन करण्याची आणि आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता जाग आली म्हणणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी आम्ही केलेली आहे,’ असं ओझा म्हणाले.

तसेच आमची तक्रार खोटी निघाली, तर आम्हाला कठोर शिक्षा द्यावी. आम्हाला फाशी दिली जावी, असंही आम्ही लिहून दिलंय. पण एफआयआर दाखल करुन तपास तर करा. त्यापासून पळ का काढताय. यात काय राजकारण सुरु आहे? छत्रपतींच्या भूमीत अत्याचार पीडित तरुणीच्या वडिलांना न्यायासाठी ५ वर्षे फिरावं लागतंय ही शरमेची बाब आहे, असं ओझा म्हणाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago