महाराष्ट्र

पंतप्रधानांचा बाप काढणाऱ्यांना आज नीतिमत्तेची आठवण येतेय, भातखळकरांची राऊतांवर टीका

सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी एकेरीत उल्लेख केला होता. सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून राऊतांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला, यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आता तिखट शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.

पंतप्रधानांचा बाप काढणारे, अर्णब गोस्वामी यांना सभ्य भाषेत बोलण्याचा उपदेश करत आहेत. मुख्यमंत्र्यांचा अपमान जर राज्याचा अपमान असेल तर पंतप्रधानांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान नव्हता का?, काय म्हणावं याला ‘आपला तो बाब्या…’ की ‘पेरावे ते उगवते’?, अशा शब्दात भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांवर आणि राऊतांवर बोचरी टीका केली आहे.

भातखळकर म्हणाले की, ज्यांनी प्रधानमंत्र्यांचा बाप काढला, अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये वारंवार आमच्यासारख्या विरोधकांचा उल्लेख केला, त्यांना नितीमत्तेची आठवण येत आहे, हे पाहून आश्चर्य वाटतंय. हे जनमतावर निवडून आलेले मुख्यमंत्री नसून जनतेचा विश्वासघात करुन झालेले मुख्यमंत्री आहेत, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावे. मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान, हे संजय राऊतांचं म्हणणं अत्यंत हास्यास्पदच आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago