ज्येष्ठ रुग्णांना कोरोनामुळे अधिक जोखीम असते, त्यामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी पालिकेने आता एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लक्षणे असलेल्या करोनाबधित ज्येष्ठ नागरिकांना करोना रुग्णालयात दाखल होणे आता बंधनकारक असणार आहे.
६० वर्षांवरील रुग्णांची प्रकृती खालावल्यानंतर उपचारासाठी धावपळ करणे योग्य नाही. वेळेत उपचार मिळावेत यासाठी रुग्णाला पालिकेच्या किंवा खासगी आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात येईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
६० वर्षांवरील आणि इतर आजार असलेल्या रुग्णांना सुरुवातीचे चार दिवस सौम्य लक्षणे असली तरी साधारण पाच ते नऊ दिवसांमध्ये अचानक ऑक्सिजनची पातळी कमी होते. अशा वेळेस तातडीने उपचार देणे गरजेचे असते. परंतु रुग्ण घरी असल्यास रुग्णालयात दाखल होईपर्यंत किमान चार तास जातात आणि रुग्णांची प्रकृती गंभीर होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या रुग्णांनी आरोग्य केंद्रामध्ये देखरेखीखाली राहणे अधिक सुरक्षित असल्याचे बॉम्बे रुग्णालयातील डॉ. गौतम भन्साली यांनी सांगितले.
उच्चभ्रू सोसायटय़ांमध्ये ६० वर्षांवरील रुग्ण करोना आरोग्य केंद्रामध्ये दाखल होण्यास तयार नसतात. त्यामुळे देखील असा नियम करण्याची वेळ पालिकेवर आल्याचे सांगण्यात आले.
मुंबईत ५७ टक्के मृत्यू हे ६० वर्षांवरील रुग्णांचे झाल्याची नोंद आहे.
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…