पार्थ पवार यांनी ट्विट करत राम मंदिर निर्माणाला आपल्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पार्थ पवार यांचं ट्विट
अयोध्येत श्री राम जन्मभूमीचे भूमिपूजन होत आहे. श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक असलेले श्री राम अखेरीस शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवासापाठी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत. राम जन्मभूमी प्रकरणातून आणखी एक मोठा धडा आपण शिकला पाहिजे. विजयात आपण विनम्र असलं पाहिजे. युक्तिवाद कितीही तर्कहीन, सदोष किंवा दुबळे असले तरीही बाबरी मशिदीविषयी एक भावना होती. जे हरले त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. त्यांचे तर्क आणि दावे पूर्णपण पराभूत झाले आहेतच, आता आपण थोडे पुढे गेले पाहिजे. आपला पराभव झाला आहे, असं ज्यांना वाटत आहे, त्यांना या विजयाच्या क्षणी आपण बरोबर घेतलं पाहिजे. आजच्या आधुनिक भारतात रामलल्ला यांना अयोध्येत हक्काचे जे होते ते मिळाले. या क्षणी रामराज्याची आठवण आपल्याला होणे साहजिक आहे. रामराज्य ही संकल्पना बापूंना प्रिया होती. रामराज्यात रामाची पूजा होत असे. कारण रामराज्यात प्रत्येक मनुष्यमात्र नव्हे तर प्राणीमात्रालाही सन्मानाने वागवलं जात असे. “जय श्री राम”
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…