अहिल्यानगर

राधाकृष्ण विखे यांचे बोलणे नैराश्यातून, त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व देत जाऊ नका – बाळासाहेब थोरात

अहमदनगर : संगमनेर शहरात गुरुवारी दिल्ली नाका परिसरात गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. राधाकृष्ण विखे यांनी या घटनेचा निषेध केला होता. तसेच संगमनेर तालुक्यात लोकप्रतिनिधीचा वचक राहिला नाही, अशी टीका देखील त्यांनी केली होती.

बाळासाहेब थोरात यांनीही आता संगमनेरमधील घटनेसंबंधी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, ‘ही घटना दुर्दैवी आहे. असे घडायलाच नको होते, असे आपले मत आहे. पोलिस आणि प्रशासन शेवटी जनतेच्या आरोग्यासाठीच काम करीत आहेत. त्यांचे काम ते करीत असताना त्यांना अशी वागणूक देणे चुकीचे आहे. यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्या दृष्टीने पोलिसांनी काम करावे.”

यावेळी राधाकृष्ण विखेंच्या टीकेबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, “विखे पाटील काय बोलतात याला फार महत्त्व देत जाऊ नका. ते विरोधी पक्षाच्या भूमिकेतून नैराश्यातून बोलत असतात. त्यांच्या मतदारसंघात कधी चुकीचे काही घडत नाही, असे नाही. शेवटी मानवी स्वभाव आहे. विखे यांचे बोलणे नैराश्यातून येत असते. त्यामुळे त्यांना मीडियाने फार महत्त्व देऊ नये, असे माझे मत आहे.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago