How To Ensure That Eggs Are Safe To Eat During Monsoons
पुणे : मान्सून आपल्यासोबत हवामानातील सुखद बदल घेऊन येतो. परंतु हा असा ऋतू आहे, ज्यामध्ये शरीरासाठी असुरक्षितता वाढते आणि अनेक हंगामी संक्रमण, ऍलर्जी, जलजन्य आणि वायुजन्य रोग होऊ शकतात; आणि हेच कारण आहे की पावसाळ्यात आपण सर्वांनी बाहेरचे खाणे टाळावे आणि अंडी, मांस आणि मासे खाणे कमी करावे असे सुचवले जाते.
तथापि, खाण्याअगोदर तुम्ही बाजारातून विकत घेतलेली अंडी, मासे आणि मांस खाण्यासाठी सुरक्षित आहेत की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे आणि ती खाण्यायोग्य आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत, त्या जाणून घेऊयात…
अंडी :
पावसाळ्यात ओलसर हवामानामुळे जीवाणू आणि रोगजनकांचा प्रादुर्भाव होतो. ही अशी वेळ आहे जेव्हा अपचन, अन्नातून विषबाधा आणि पोट खराब होऊ शकते. या हंगामात अंडी खाणे टाळणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. तथापि, जर तुमची अंडी खाण्याची इच्छा असेल तर अंडी ताजी आहे की शिळी आहे हे समजून घेण्यासाठी ही चाचणी तुम्हाला मदत करेल.
चिकन :
जर तुम्ही या हंगामात मांस शिजवत असाल, तर आपण स्वयंपाकघरातील थर्मामीटर वापरून मांसाचे तापमान तपासू शकता. अन्नातून विषबाधा होऊ शकते किंवा पोट खराब होऊ शकते, त्यामुळे रोगजनक किंवा जीवाणू खाण्याची कोणतीही शक्यता टाळण्यासाठी ते चांगले शिजवल्याची खात्री करा.
मासे :
अनेकांना मासे आणि स्वादिष्ट सीफूड खाणे आवडते, परंतु पावसाळ्यात ते खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ असतो आणि त्यांच्या शरीरात होणारे बदल किंवा संसर्गजन्य पदार्थांचा कोणताही परिणाम ते खाल्ल्यावर माणसात होतो, म्हणूनच आपण मासे खाणे टाळायला हवे. तरीदेखील तुम्ही मासे खाण्याचा मोह टाळू शकत नसाल तर तुम्ही फक्त ताजे फिश खात आहात याची खात्री करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी तपासू शकता.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…