लाइफ स्टाइल

आहारात मिठाचं प्रमाण किती असावं? WHO ने दिला अतिशय मोलाचा सल्ला

मीठ हा सोडियमचा स्त्रोत आहे आणि मीठाच्या अति सेवनाचे अनेक दुष्परिणाम संभवतात. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) अतिशय मोलाचा सल्ला दिला आहे. कोणासाठी किती मीठ गरजेचं आहे, हे WHO ने सांगितलं आहे.मीठाच्या अति सेवनाने हृदयरोग आणि स्ट्रोकचा जास्त धोका संभवतो, ज्यामुळे दरवर्षी अंदाजे 3 दशलक्ष व्यक्ती मृत्युमुखी पडतात.

सोडियम हा घटक शरीरातील प्लाझ्माचं प्रमाण, अॅसिड बेस आणि शरीरारील नसांसाठी महत्त्वाचा असतो. पण, त्याचं अती सेवनही धोक्याचं असतं. ज्यामुळे याचे थेट परिणाम रक्तदाबावर दिसून येतात.

आहारात मीठ विविध मार्गांनी समाविष्ट होत असतं. बेकन, चीज, वरुनही मीठ टाकलेले पदार्थ जसे की वेफर्स, इन्स्टंट नूडल्स आणि इतर काही साठवणीचे पदार्थ यामध्ये मीठाचा वापर केला जातो. काही पदार्थ शिजवतानाही त्यामध्ये मीठ टाकलेलं असतं. याव्यतिरिक्त विविध प्रकारचे पदार्थांची चव वाढवणारे सॉसही नकळतच रोजच्या जेवणात मीठाचं प्रमाण वाढवतात.

मिठाचं प्रमाण कोणासाठी किती?

  1. जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार प्रौढ वयोगटातील व्यक्तींनी एका दिवसाला 5 ग्रॅमहूनही कमी (एक टीस्पून पेक्षाही कमी) मीठाचं सेवन केलं पाहिजे.
  2. 15 वर्षांखालील बालकांनी प्रौढ वयोगटाहूनही कमी प्रमाणात मीठाचं सेवन करावं. (या वयोगटात 0 ते 6 महिने वयोगटातील स्तनपान घेणाऱ्या बालकांचा समावेश नाही).
  3. सेवन केलं जाणारं मीठ आयोडिनयुक्त असावं. याची मदत मेंदूच्या वाढीसाठी होते.

दैनंदिन जीवनात मीठाचं प्रमाण कमी कसं करावं?

  1. जेवणाच्या टेबलावर किंवा पानात जास्तीचं मीठ ठेवू नका
  2. मीठाचा जास्त वापर केलेल्या पदार्थांचं सेवन टाळा
  3. सोडियमचं प्रमाण कमी असणाऱ्या पदार्थांना प्राधान्य द्या

जागतिक आरोग्य संघटनेने फक्त घरच्या घरीच नव्हे तर, रेस्टराँ आणि खाद्यपदार्थ उद्योगांनाही मीठाचं प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिला आहे. त्याबरोबरच आणखी काही उपयुक्त माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये नागरिकांना सोडियमच्या अतिसेवनाने उदभवणारा धोका नेमका कसा आहे, हे सांगण्यासोबतच रेस्टराँमध्ये देखील टेबलवरुनही मीठाची बाटली दूर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…

17 तास ago

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

2 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago