How much salt should be in the diet? Valuable advice from WHO
मीठ हा सोडियमचा स्त्रोत आहे आणि मीठाच्या अति सेवनाचे अनेक दुष्परिणाम संभवतात. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) अतिशय मोलाचा सल्ला दिला आहे. कोणासाठी किती मीठ गरजेचं आहे, हे WHO ने सांगितलं आहे.मीठाच्या अति सेवनाने हृदयरोग आणि स्ट्रोकचा जास्त धोका संभवतो, ज्यामुळे दरवर्षी अंदाजे 3 दशलक्ष व्यक्ती मृत्युमुखी पडतात.
सोडियम हा घटक शरीरातील प्लाझ्माचं प्रमाण, अॅसिड बेस आणि शरीरारील नसांसाठी महत्त्वाचा असतो. पण, त्याचं अती सेवनही धोक्याचं असतं. ज्यामुळे याचे थेट परिणाम रक्तदाबावर दिसून येतात.
आहारात मीठ विविध मार्गांनी समाविष्ट होत असतं. बेकन, चीज, वरुनही मीठ टाकलेले पदार्थ जसे की वेफर्स, इन्स्टंट नूडल्स आणि इतर काही साठवणीचे पदार्थ यामध्ये मीठाचा वापर केला जातो. काही पदार्थ शिजवतानाही त्यामध्ये मीठ टाकलेलं असतं. याव्यतिरिक्त विविध प्रकारचे पदार्थांची चव वाढवणारे सॉसही नकळतच रोजच्या जेवणात मीठाचं प्रमाण वाढवतात.
मिठाचं प्रमाण कोणासाठी किती?
दैनंदिन जीवनात मीठाचं प्रमाण कमी कसं करावं?
जागतिक आरोग्य संघटनेने फक्त घरच्या घरीच नव्हे तर, रेस्टराँ आणि खाद्यपदार्थ उद्योगांनाही मीठाचं प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिला आहे. त्याबरोबरच आणखी काही उपयुक्त माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये नागरिकांना सोडियमच्या अतिसेवनाने उदभवणारा धोका नेमका कसा आहे, हे सांगण्यासोबतच रेस्टराँमध्ये देखील टेबलवरुनही मीठाची बाटली दूर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…