मनोरंजन

मलाही आपल्या इतिहासाचा अभिमान, पण… छावा सिनेमाबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर स्वरा भास्करचे स्पष्टीकरण

मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ सिनेमा 14 फेब्रुवारीला रिलीज झाला. त्यानंतर या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. एका आठवड्यात सिनेमाने 300 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा सिनेमा पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. शंभूराजांनी बुऱ्हाणपूरची लूट केल्यानंतर औरंगजेब सूडाने पेटला आणि दिल्ली सोडून तो दक्षिणेत चाल करुन आला. त्यानंतर संभाजी महाराजांनी त्याला नऊ वर्ष झुंज दिली, असा सर्व ऐतिहासिक घटनाक्रम हा सिनेमात दाखवण्यात आलाय. दरम्यान, सिनेमाला सर्वांकडून तुफान प्रतिसाद मिळत असताना अभिनेत्री स्वरा भास्करने याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर संपूर्ण देशभरातून तिच्यावर टीकेची झोड उठली. अखेर स्वराने तिच्या वादग्रस्त पोस्टवर आज X या प्लॅटफॉर्मवरुन स्पष्टीकरण दिलं आहे.

स्वरा भास्कर म्हणाली कि, मी केलेल्या ट्वीटमुळे अनेक वादविवाद झाले आणि काही टाळता येण्याजोगे गैरसमज देखील निर्माण झाले आहेत. मी निःसंशयपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर वारशाचा आणि योगदानाचा आदर करते.. विशेषत: त्यांच्या सामाजिक न्याय आणि स्त्रीयांच्या सन्मानासाठी मांडलेल्या भूमिकांचाही मी आदर करते. माझा मुद्दा एवढाच आहे की, आपल्या इतिहासाचा गौरव करणे खूप छान आहे, पण कृपया सध्याच्या चुका आणि अपयश लपवण्यासाठी ऐतिहासिक वैभवाचा गैरवापर करू नका. इतिहास हा नेहमी लोकांना एकत्र आणण्यासाठी वापरला गेला पाहिजे. लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी आणि सध्याच्या समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी नाही. जर माझ्या आधीच्या ट्विटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल खेद आहे..
इतर कोणत्याही अभिमानी भारतीयाप्रमाणे मलाही आपल्या इतिहासाचा अभिमान आहे. आपल्या इतिहासाने आपल्याला एकत्र आणले पाहिजे आणि चांगल्या आणि अधिक समावेशक भविष्यासाठी लढण्यासाठी आपल्याला बळ दिले पाहिजे.

स्वरा भास्कर काय म्हणाली होती?
चेंगराचेंगरी होऊन लोकांचे भयावह मृत्यू झाले आहेत, पण ते सोडून चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून लोक भावूक होत असतील किंवा संताप व्यक्त करत असतील तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय. गैरव्यवस्थापनामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचे मृत्यू झाले आहेत. त्यांचे मृतदेह बुलडोझरद्वारे काढावे लागले. यावर चिंता न व्यक्त करता समाज 500 वर्षांपूर्वी घडलेला चित्रपटातील सीन पाहून भावूक होत आहे, संताप व्यक्त करत आहे, असं स्वरा भास्करने म्हटलं होतं.

500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असेल तर तो समाज मेंदूने आणि आत्म्याने मृत, स्वरा भास्करचे ‘छावा’ चित्रपटाबद्दल वादग्रस्त विधान

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago