Tollywood Producer BA Raju Passed Away Due To Cardiac Arrest
हैदराबाद : ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट निर्माते बी.ए. राजू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज (22 मे) रात्री उशिरा हैदराबादच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने तेलगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला असून त्यांच्यामागे दोन मुले आहेत. त्यांची पत्नी बी जया या सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका होत्या.
बी.ए. राजू हे तेलुगु चित्रपटसृष्टी व्यवसायातील एक अविभाज्य भाग होते. ते लोकप्रिय तेलगू चित्रपटमासिक ‘सुपरहिट’ चे संस्थापक आणि संपादकही होते. त्यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत शेकडो चित्रपटांसाठी पीआर देखील सांभाळले. ते सुपरस्टार महेश बाबू यांचे वैयक्तिक पीआरओ देखील राहिले आहेत. ते अनेक आघाडीचे स्टार, प्रोडक्शन हाऊसेस आणि अभिनेत्रींचे वैयक्तिक पीआरओ देखील राहिले आहेत. ते प्रभास पट्टन, नागार्जुन आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासह अनेक मोठा स्टार्सचे पीआरओ राहिले आहेत.
गायक केव्हिनच्या मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासा, गॅलरीत मॉडेलबरोबर करत होता रोमान्स तेवढ्यात…
महेश बाबू यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले कि, “बी.ए. राजू यांच्या आकस्मिक निधनाने मी फार दु: खी आहे आणि यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. मी लहानपणापासूनच त्यांना ओळखतो. आम्ही बर्याच वर्षांपासून एकत्र प्रवास केला आणि मी त्यांच्याबरोबर खूप जवळून काम केले. तो एक मृदू हृदयाचा आणि पूर्ण व्यावसायिक माणूस होता, ज्याला सिनेमाबद्दल अत्यंत उत्कट प्रेम होते. आमच्या कुटुंबासाठी आणि मीडियासाठी हे एक मोठे नुकसान आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. तुमची कमतरता नेहमी जाणवेल.”
अभिनेत्री कंगना रनौतच्या बॉडीगार्डवर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…