हैदराबाद : ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट निर्माते बी.ए. राजू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज (22 मे) रात्री उशिरा हैदराबादच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने तेलगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला असून त्यांच्यामागे दोन मुले आहेत. त्यांची पत्नी बी जया या सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका होत्या.
बी.ए. राजू हे तेलुगु चित्रपटसृष्टी व्यवसायातील एक अविभाज्य भाग होते. ते लोकप्रिय तेलगू चित्रपटमासिक ‘सुपरहिट’ चे संस्थापक आणि संपादकही होते. त्यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत शेकडो चित्रपटांसाठी पीआर देखील सांभाळले. ते सुपरस्टार महेश बाबू यांचे वैयक्तिक पीआरओ देखील राहिले आहेत. ते अनेक आघाडीचे स्टार, प्रोडक्शन हाऊसेस आणि अभिनेत्रींचे वैयक्तिक पीआरओ देखील राहिले आहेत. ते प्रभास पट्टन, नागार्जुन आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासह अनेक मोठा स्टार्सचे पीआरओ राहिले आहेत.
गायक केव्हिनच्या मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासा, गॅलरीत मॉडेलबरोबर करत होता रोमान्स तेवढ्यात…
महेश बाबू यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले कि, “बी.ए. राजू यांच्या आकस्मिक निधनाने मी फार दु: खी आहे आणि यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. मी लहानपणापासूनच त्यांना ओळखतो. आम्ही बर्याच वर्षांपासून एकत्र प्रवास केला आणि मी त्यांच्याबरोबर खूप जवळून काम केले. तो एक मृदू हृदयाचा आणि पूर्ण व्यावसायिक माणूस होता, ज्याला सिनेमाबद्दल अत्यंत उत्कट प्रेम होते. आमच्या कुटुंबासाठी आणि मीडियासाठी हे एक मोठे नुकसान आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. तुमची कमतरता नेहमी जाणवेल.”
अभिनेत्री कंगना रनौतच्या बॉडीगार्डवर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…