multiple credit cards what are its advantages and disadvantages how to use multiple credit card together
नवी दिल्ली : तुमच्याकडे अनेक क्रेडिट कार्ड असल्यास, त्याचे फायदे आणि तोटे दोन्हीही आहेत. अनेक क्रेडिट कार्ड असल्याने तुम्हाला काही वेळा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. जर कार्डधारकांनी कार्डवर सतत नजर ठेवली नाही, तर ते कर्जाच्या जाळ्यात अडकू शकतात. तज्ञांचे म्हणणे आहे की जर आपल्याकडे अनेक क्रेडिट कार्ड असतील, तर त्यांचा योग्य वापर करणे महत्वाचे आहे.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीने अनेक क्रेडिट कार्ड ठेवू नयेत. तसेच, व्यक्तीकडे योग्य कार्ड असणे आवश्यक आहे आणि त्याबरोबरच त्याचा योग्य वापर करणे देखील आवश्यक असते. त्यासाठी अधिक रिवॉर्ड पॉइंट किंवा ऑफर देणारे कार्ड निवडावे. तसेच क्रेडिट कार्डचा वापर कमीत कमी केल्यास ते चांगले आहे, त्याचा वापर गुणोत्तर राखणे महत्वाचे असते. वापरकर्त्याने एका वेळी 30-40 टक्क्यांपेक्षा जास्त क्रेडिट मर्यादा वापरू नये. वापरकर्त्याकडे वेगवेगळी क्रेडिट कार्ड असू शकतात, पण जर ती 20-30 टक्के वापरली गेली तर ते चांगले आहे. जर कार्ड 80 टक्के ते 90 टक्के वापरले गेले, तर हे दर्शवते की वापरकर्ता कर्जासाठी भुकेला आहे. अशा प्रकारे कार्ड्सची संख्या महत्त्वाची नाही, तर कार्डचा वापर किती करायचा ते महत्वाचे ठरते.
वेळेवर पेमेंट आवश्यक :
एखाद्याकडे अनेक क्रेडिट कार्ड असतील तर ते ठीक आहे, परंतु जर या कार्डचे पेमेंट वेळेवर भरले गेले नाही, तर त्याचा क्रेडिट स्कोअरवर परिणाम होईल. क्रेडिट कार्डचे पेमेंट दिलेल्या तारखेच्या आत केल्यास क्रेडिट कार्डवरील उशीरा शुल्क (late charges) टाळता येऊ शकते. यासाठी आपण फोनवर मंथली रिमाइंडर लावून ठेवू शकता. जर वापरकर्त्यांनी त्यांचे खर्च आणि परतफेड करण्याची योग्य योजना आखली, तर कार्डांच्या संख्येने काही फरक पडत नाही. वापरकर्ता कार्ड वापरून खर्च केलेली रक्कम वेळेत भरण्यास सक्षम असणे आवश्यक असते.
एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डचा वापर कसा करावा?
क्रेडिट कार्डचा योग्य वापर करणे फार महत्वाचे आहे, अन्यथा तुम्ही कर्जाखाली दबून जाऊ शकता.
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…