Bank transactions will now become more expensive, RBI approves rate hike
मुंबई : एटीएममधून पैसे काढणे आता महाग होणार आहे. आयसीआयसीआय बँक 1 जानेवारी 2022 पासून एटीएममधून मोफत पैसे काढण्याच्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी शुल्क वाढवणार आहे. त्यामुळे आता 20 रुपयांऐवजी प्रत्येक व्यवहारावर 21 रुपये कापले जातील.
या वर्षी जूनमध्ये, आरबीआयने बँकांना एटीएमद्वारे निश्चित मोफत मासिक मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी किंवा इतर व्यवहार करण्यासाठी पुढील वर्षापासून शुल्क वाढवण्याची परवानगी दिली होती. म्हणजेच 1 जानेवारी 2022 पासून, जर बँक ग्राहकांनी मोफत पैसे काढण्याच्या किंवा इतर सुविधांच्या (डोमेस्टिक सेव्हिंग खात्यासाठी सेवा शुल्क) निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केले तर त्यांना प्रति व्यवहारासाठी 21 रुपये द्यावे लागतील.
आरबीआयच्या परिपत्रकानुसार, इतर बँकांच्या एटीएममध्ये कार्ड वापरण्यासाठी लागणारा खर्च आणि इतर शुल्क वाढल्याने बँकांना प्रति व्यवहार ग्राहक शुल्क 21 रुपये करण्याची परवानगी देण्यात आली आहे. वाढीव शुल्क 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.
ICICI बँकेच्या सूचनेनुसार, जेव्हा ग्राहक त्यांच्या बँकेच्या ATM मधून दर महिन्याला 5 मोफत व्यवहारांची (आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहार) पात्रता ओलांडतो तेव्हा हे शुल्क लागू होते. ते महानगरांमधील इतर बँकांच्या एटीएममध्ये तीन वेळा आणि लहान शहरांमध्ये 5 वेळा व्यवहार करू शकतात.
आरबीआयने प्रति आर्थिक व्यवहारासाठी इंटरचेंज फी 15 रुपयांवरून 17 रुपये आणि गैर-आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत 5 रुपयांवरून 6 रुपये करण्याबद्दल देखील सांगितले होते.
इंटरचेंज फी काय आहे?
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँका त्यांच्या ग्राहकांच्या सोयीसाठी एटीएम बसवतात. यासोबतच इतर बँकांच्या ग्राहकांनाही सेवा दिल्या जातात. विहित मर्यादेपेक्षा जास्त वापरासाठी, ते एक शुल्क आकारतात ज्याला इंटरचेंज फी म्हणतात.
आरबीआयने सांगितले होते की, एटीएम उभारणीचा वाढता खर्च आणि एटीएम ऑपरेटर्सचा वाढता देखभाल खर्च लक्षात घेऊन शुल्क वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे. संबंधित युनिट्सच्या सुविधा आणि ग्राहक यांच्यात समतोल राखण्याची गरज याची काळजी घेतली जाते.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…