इंदौर : चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या नराधमांनी एका महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तीन नराधमांनी चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार केला. कोरोनाची लागण झाल्यामुळे ही महिला विलगीकरणात राहत होती. नराधमांनी 50 हजार रुपये आणि मोबाईल तर चोरलाच पण या महिलेवर सामूहिक बलात्कार देखील केला. ही घटना मध्य प्रदेशातील इंदौर येथे घडली आहे.
इंदौरच्या लसूडिया ठाणा क्षेत्रातील पंचवटी कॉलनीत राहणाऱ्या 37 वर्षीय महिलेच्या घरी हा प्रकार घडला. पीडिते महिलेने पोलिसांना सांगितलं की कोरोनाबाधित असल्यानं ती घरी एकटीच विलगीकरणात राहत होती. गुरुवारी रात्री दोन वाजता तिला जाग आली त्यावेळी तिच्या बेडशेजारी तीनजण उभे होते. त्यांनी चाकूचा धाक दाखवत तिच्याकडे पैसे आणि दागिने मागितले. महिलेने त्यांना घरात असलेले 50 हजार रुपये आणि दोन मोबाईल दिले. परंतु, तेवढ्यावर त्यांचे समाधान झाले नाही. त्या तिघांनीही संधी साधून महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यांच्या हातात चाकू आणि कात्री असल्यामुळे हत्येच्या भितीने तिने आवाज केला नाही. त्यानंतर बराच वेळ एक आरोपी या तरुणीच्या घराबाहेरच थांबला. सकाळ झाल्यानंतर त्या आरोपीने तेथून पळ काढला.
महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तीन अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. शुक्रवारी सकाळी या महिलेची मेडिकल टेस्ट करण्यात आली. पोलिसांनी तपास सुरु केला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर, तिसरा आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. या दोघांनीही गुन्हा कबूल केला आहे. यातील एकाच नाव दीपक असून तो अजूनही फरार आहे. तो युवतीचा शेजारी आहे. दोन महिन्यांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला होता. त्याची माहिती देणाऱ्यासाठी 20 हजाराचं बक्षीस जाहीर कऱण्यात आलं आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…