five of a family including three minors killed in ayodhya
लखनौ : एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यात तीन लहान मुलांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील इनायतनगर ठाण्याच्या हद्दीत ही भयंकर घटना घडली आहे. पोलीस या घटनेचा तपास करीत असून मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अयोध्यामध्ये संपत्तीच्या वादातून शनिवारी रात्री एकाच कुटुंबातील पाच जणांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली. या घटनेत पती-पत्नी, त्यांची दोन मुलं आणि एका मुलीचा मृत्यू झाला आहे. या तीनही मुलांचं वय दहा वर्षापेक्षा कमी आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले.
बापरे! खराब हवामानामुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या २१ स्पर्धकांचा मृत्यू
ही हत्या मालमत्तेच्या वादावरुन झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा भाचा त्यांच्याबरोबर एकाच घरात राहत होता, त्याने हा गुन्हा केला असावा कारण तो सध्या फरार आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत, परंतु, अद्याप ही हत्या करण्यात किती जणांचा समावेश होता, याबाबत माहिती मिळालेली नाही. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी पाच पथकं तयार केली आहेत.
प्रेमीयुगुलाने घरच्यांच्या विरोधाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल
कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय, पादचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास वाहन चालक जबाबदार नाही
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…