corona
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग ३ ते ५ मे दरम्यान शिगेला पोहोचू शकतो, असा अंदाज केंद्र सरकारने नेमलेल्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्यानंतर देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ शकते.
देशात शुक्रवारी कोरोना रुग्णांची संख्या वाढून ३.८६ लाखांवर गेली होती. रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशात ऑक्सिजन, औषधं आणि उपचारासाठी आवश्यक वस्तूंच्या तुटवड्याचा सामना करावा लागतोय. अनेक देशांनी भारताला मदतही पाठवली आहे. मात्र, देशातील आरोग्ययंत्रणांवर प्रचंड ताण पडत असून आरोग्यसेवा अपुऱ्या पडत आहेत.
देशात कोरोना संसर्गासंदर्भात शास्त्रज्ञांची एक सल्लागार टीम नेमण्यात आली असून त्याचे प्रमुख एम. विद्यासागर म्हणाले कि, “देशात जुलै आणि ऑगस्टदरम्यान कोरोनाचा संसर्ग शिगेला (पीक) जाईल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या अंदाजांबाबत आम्ही गंभीर नाही. कारण तोपर्यंत देशातील संसर्गाची लाट ओसरलेली असेल आणि स्थिती नियंत्रणात असेल. आपण काळजी घेतल्यास दिवसेंदिवस ही संख्या कमी होईल. मात्र या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला जे काही करायचं आहे ते आताच करावं लागेल. कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा.”
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…