कोरोना

कोरोनाचा विषाणू नाकावाटे थेट मेंदूपर्यंत जातो, संशोधनात समोर आली माहिती

कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध पातळीवर संशोधन सुरु आहे. त्यातच आता नवीन संशोधनानुसार, कोरोनाचा विषाणू नाकावाटे थेट मेंदूपर्यंत जातो आणि संपूर्ण शरीरावर परिणाम करत असल्याचे समोर आले आहे. ‘नेचर न्यूरोसायन्स’ या नियतकालिकात याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

या संशोधनात कोरोनाचा विषाणू शरीराच्या विविध अवयवांपर्यंत कसा जातो याबाबतची निरीक्षणे नोंदवली आहेत. वास न येणे, चव नसणे, डोकेदुखी, थकवा अशा प्रकारची लक्षणे संबंधित रुग्णाला थेट मेंदूपर्यंत कोरोना विषाणू पोहोचल्यानेच दिसू लागतात. या संशोधनामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल लक्षणे काय आहेत तसेच त्यांच्यावर उपचार कसे करावे याबाबत मदत मिळेल.

जर्मनीतील चारिटे विद्यापीठातील संशोधकांनी श्वासनलिकेची घश्याच्या वरच्या भागापासून ते नाकापर्यंत तपासणी केली. या संशोधनात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ३३ रुग्णांचा देखील समावेश होता. यामध्ये ११ महिला आणि २२ पुरुष होते. मृतांचे सरासरी वय हे ७१.६ टक्के होते. कोरोनाची लक्षणे आढळण्यापासून मृत्यू होईपर्यंत सरासरी ३१ दिवस ते जगले. संशोधकांना मेंदू आणि श्वसन नलिकेत सार्स-सीओव्ही२ आरएनए आणि प्रोटीन आढळले.

थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

1 आठवडा ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

1 आठवडा ago

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे.…

1 आठवडा ago

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय

मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य…

1 आठवडा ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध सामंजस्य करार

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये…

3 आठवडे ago

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक…

4 आठवडे ago