Yashaswini Woman brigade president Rekha Bhausaheb Jare murder in Ahmednagar
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे अनेकांना मोठा धक्का बसला असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे. रेखा जरे, त्यांचा मुलगा, त्यांची आई तसेच डॉ. माने या पुण्याहून काम उरकून येत असताना जतेगाव घाटात ही घटना घडली. कारची काच एका दुचाकीला लागल्यामुळे वाद झाला. त्या वादातूनच रेखा जरे यांच्या मानेवर वार करण्यात आले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती जरे यांच्या मुलाने पोलिसांना दिली आहे. दुचाकीवर दोन जण होते. ते नेमके को होते, याबाबत अधिक तपशील अजून मिळालेला नाही, असे ढुमे यांनी स्पष्ट केले. गाडीला कट मारल्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…