दूध दरावरून महायुती, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आणि विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन सुरू आहेत. या आंदोलना दरम्यान सोलापूर येथे माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर भंपक आणि फालतू माणसासोबत पुन्हा काम करणार नाही, अशा शब्दात टीका केली होती.
या टीकेला उत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टीवर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोनामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे मिळाले, दुधाला दर नाही, शिवाय शेतकऱ्यांना सरासरी 34 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. आता शेतकऱ्यांच्या या साऱ्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. स्वाभिमानी संघटनेच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिकाधिक महत्त्व द्यावं, असं खोत म्हणाले.
खोत म्हणाले की, ठीक आहे, आम्ही फालतू माणसं होतो पण आम्ही फालतू माणसांनी संघटना वाढवली. त्यामुळे तुम्ही आमदार, दोनवेळा खासदार होऊ शकला. शेतकऱ्यांचे नेते म्हणून तुम्ही राज्य करू शकला. पण मला त्यांच्यासारखं सरड्यासारखे रंग बदलता येत नाही. त्यामुळेच अशा भंपक माणसाविषयी फार बोलावे, अशी माझी इच्छा नाही. त्यांनी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवावा, सदाभाऊच्या विषयावर आवाज उठविण्यासाठी अजून चार वर्षे बाकी आहेत. 2024 ला आपण आमने-सामने येऊ शकतो आणि एकमेकांना उत्तर देऊ शकतो, असा इशारा खोत यांनी दिला आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…