नवी दिल्ली : आजपासून WhatsApp ची नवीन प्रायव्हेसी पॉलिसी लागू होणार आहे. या नवीन पॉलिसीअंतर्गत आता यूजर्सचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जाणार आहे. WhatsApp ची नवीन पॉलिसी स्विकारणे यूजर्सना अनिवार्य आहे. अन्यथा यूजरला व्हॉट्सअॅपच्या कोणत्याही सुविधेचा लाभ घेता येणार नाही.
व्हॉट्सअॅपच्या या प्रायव्हेसी पॉलिसीवर टीका होत आहे. त्यामुळे कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत कंपनीने म्हटले आहे की, बहुतांश अॅप आणि वेबसाइट्स अशाच प्रकारची पॉलिसी ठेवतात व ते WhatsApp च्या तुलनेत अधिक डेटा जमा करतात. WhatsApp ने याबाबत ५ मे ला न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात कंपनीने म्हटले आहे की, Zomato, BigBasket, Ola, Koo, Truecaller आणि Aarogya Setu सारखे अॅप्स यूजर्सकडून मोठ्या प्रमाणात डेटा कलेक्ट करतात. या याचिकेत Microsoft, Google, Zoom आणि Republic TV चॅनेलच्या डिजिटल साइटचा देखील उल्लेख आहे. कंपनीने म्हटले आहे की, अनेक अॅप्स व वेबसाइटच्या प्रायव्हेसी पॉलिसीची समिक्षा केल्यानंतर हे स्पष्ट झाले की त्यांच्याद्वारे जमा केला जाणारा डेटा व्हॉट्सअॅपच्या २०२१ च्या अपडेट सारखाच आहे. तर अनेक अॅप्स यापेक्षा अधिक डेटा जमा करतात.
कंपनीने म्हटले आहे की, त्यांच्या नवीन प्रायव्हेसी पॉलिसीला मंजूरी न मिळाल्यास देशातील टेक कंपन्यांना काम करण्यास अडचण येईल. यात सर्वाधिक अडचण किराणा डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांना होईल.
दिल्ली उच्च न्यायालयाने जानेवारी महिन्यातच व्हॉट्सअॅपविरोधात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेत म्हटले होते की, नवीन प्रायव्हेसी पॉलिसीला स्विकार करायचे की नाही हे यूजर्सवर अवलंबून आहे. जर एखाद्या यूजर्सला अटी मान्य नसतील व अॅपचा वापर करायचा नसेल, तर करू नये. WhatsApp च्या ऐवजी दुसरे कोणतेही अॅप वापरू शकता.
नवीन प्रायव्हेसी पॉलिसी न स्वीकारल्यास काय होईल?
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…