dialogue writer subodh chopra passed away due to post covid complications
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी आपला जीव गमावला. दरम्यान, आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. ‘मर्डर’, ‘रोग’ सारख्या बर्याच चित्रपटांसाठी संवाद लेखन करणारे लेखक सुबोध चोप्रा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ४९ वर्षांचे होते. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास सुबोध चोप्रा यांचे निधन झाले.
सुबोध यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती, परंतु, उपचार घेतल्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. पण त्यानंतर कोरोनामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सुबोध चोप्रा यांचा धाकटा भाऊ श्यांकी यांनी दिली आहे.
श्यांकी यांनी सांगितले कि, “गेल्या शनिवारी त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु या सोमवारी (10 मे) त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांची ऑक्सिजन पातळी अचानक खाली जाऊ लागली. त्यांना खूप थकवा जाणवत होता आणि त्यांचा ब्लड प्रेशरही वाढत होता. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे मी त्यांना मालाडच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल केले, परंतु हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्या.”
श्यांकी यांनी पुढे सांगितले की, “सुबोधला हिंदी चित्रपट दिग्दर्शित करायचा होता, पण त्याची इच्छा अपूर्ण राहिली. त्यांनी मल्याळममधील ‘वसुधा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तो एक हुशार व्यक्ती होता.”
सुबोध यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतील अनेकजण दुःख व्यक्त करत आहेत. सुबोध चोप्रा 1997 पासून चित्रपटसृष्टीत सक्रिय होते. त्यांनी डीडी 1 ची सीरियल ‘रिपोर्टर’ मधून संवाद लेखन सुरू केले. याशिवाय सुबोध यांनी टीव्ही सीरियल ‘हकीकत’ चा १ एपिसोड आणि ‘रिश्ते’चे 6 एपिसोडसुद्धा लिहिले होते. एवढेच नाही तर त्यांनी ‘सावधान इंडिया’ च्या अनेक भागांचे दिग्दर्शनही केले होते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…