The Indian Army developed a messaging app like Whatsapp
‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेंतर्गत भारतीय लष्कराने एक नवीन मेसेजिंग अॅप डेव्हलप केलं आहे. इंडियन आर्मीकडून लाँच करण्यात आलेल्या या मेसेजिंग अॅप ला ‘Secure Application for the Internet (SAI)’ नाव दिले आहे. हे अॅप इंटरनेट द्वारे अँड्रॉयड प्लॅटफॉर्मवर अँड टू अँड सिक्योर व्हाईस, टेक्स्ट आणि व्हिडिओ कॉलिंग सर्विस सपोर्ट करते. गुरुवारी संरक्षण मंत्रालयाने याची माहिती दिली आहे.
मंत्रालयाने एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले, लष्कराकडून बनवण्यात आलेले हे अॅप व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, SAMVAD आणि GIMS सारखे आहे. हे अँड टू अँड एनक्रिप्शन मेसेजिंग प्रोटोकॉलचा वापर करते. SAI लोकल इन-हाउस सर्वर आणि कोडिंग सोबत सिक्यॉरिटी फीचर्स सह बाकीच्या अॅप्सला चांगले बनवते. या फीचर्सला आवश्यकेनुसार बदलले जावू शकते.
अॅप ची CERT-in आणि आर्मी सायबर ग्रुप च्या पॅनल ऑडिटर्स द्वारा चाचणी करण्यात आली आहे. तसेच NIC वर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स (IPR) साठी फायलिंग वर काम सुरू आहे. यासाठी iOS प्लॅटफॉर्म वर अॅप आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संरक्षण मंत्रालयाने पुढे सांगितले, SAI चा पूर्ण लष्करासाठी वापर केला जाणार आहे. या सर्विस सोबत सिक्योर मेसेजिंगची सुरुवात होऊ शकते. अॅपच्या कार्यक्षमतेचा आढावा घेतल्यानंतर संरक्षण मंत्र्यांनी कर्नल साई शंकर यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…