Today's first match is between Mumbai Indians and Lucknow Super Giants at 3.30 pm
IPL 2022 : आयपीएलमध्ये आज सुपर सॅटरडे आहे. दिवसाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात दुपारी ३.३० वाजता सुरु होणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्ससाठी सध्याची स्पर्धा दुःस्वप्न असल्यासारखी आहे. या संघाने पहिले ५ सामने गमावले असून प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मुंबईकडे आज विजयाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.
लखनौबद्दल बोलायचे झाले तर, संघाने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत आणि 3 सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. दोन सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मागील सामन्यात लखनौला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबईचा रेकॉर्ड चांगला
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड खूपच प्रभावी ठरला आहे. संघाने या मैदानावर एकूण 9 आयपीएल सामने खेळले आहेत, त्यात 6 जिंकले आहेत आणि 3 हरले आहेत. मात्र, या मोसमातही रोहित आणि कंपनीने या मैदानावर पहिला सामना खेळला आणि संघाला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. एकूणच, या मैदानाची आकडेवारी MI च्या बाजूने जाते.
वरिष्ठ खेळाडूंना जबाबदारी घ्यावी लागेल
मुंबईला पुन्हा पराभव टाळायचा असेल, तर संघातील वरिष्ठ खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल. कर्णधार रोहित शर्मापासून ते कायरॉन पोलार्डपर्यंत कुणीही आतापर्यंत फॉर्ममध्ये दिसले नाहीत. पहिल्या दोन सामन्यात सलग दोन अर्धशतके झळकावणाऱ्या इशान किशननेही नंतर विशेष खेळ दाखवला नाही. हिटमॅनने 5 डावात 108 धावा केल्या आहेत, तर पोलार्डच्या बॅटने केवळ 57 धावा केल्या आहेत.
जसप्रीत बुमराहही गोलंदाजीत लयीत नाही. त्याने 5 सामन्यात 4 विकेट घेतल्या आहेत. बुमराहची इकॉनॉमीही 8 च्या आसपास आहे. त्याच वेळी, टायमल मिल्सने मुंबई इंडियन्ससाठी आपला पहिला हंगाम खेळताना निश्चितपणे 6 विकेट घेतल्या आहेत, परंतु त्याचा इकॉनॉमी रेट देखील 10 च्या आसपास आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…