The ICC has given BCCI till June 28 to decide on the hosting of the T20 World Cup
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) २८ जूनपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. ICC च्या मंगळवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीदरम्यान याविषयी निर्णय घेण्यात आला. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-२० विश्वचषक होणार आहे. मात्र भारतातील कोरोना स्थिती पाहता ही स्पर्धा UAE येथे खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.
ICC ने BCCI ला विश्वचषकाच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी २८ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. विश्वचषकापूर्वी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर यादरम्यान इंडियन प्रीमियर लीगच्या १४व्या हंगामातील उर्वरित साामने UAE येथे खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे विश्वचषक तेथेच खेळवणे सोयीचे ठरेल, असे जाणकारांचे मत आहे. ऑक्टोबरमध्ये विश्वचषकाचे आयोजन करणे शक्य नसल्यास पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा जूनमध्ये भारतात ही स्पर्धा खेळवण्याचा पर्याय आहे. मात्र फेब्रुवारीत महिला विश्वचषक आहे, तर जूनमध्ये ‘आयपीएल’संपल्यावर भारतात पावसामुळे काही सामन्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे,’’ असे मत ICC च्या पदाधिकाऱ्यांनी मांडले आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…