KL Rahul Closes Critics With Special Celebration After Century
Ind vs Eng 2nd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. केएल राहुलने मालिकेच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले आणि आज दुसर्या सामन्यात दमदार शतक ठोकले. राहुलने इंग्लंडविरुद्ध सात चौकार आणि दोन षटकारांसह 108 धावा केल्या. 114 चेंडूत राहुलने आपले शतक पूर्ण केले.
इंग्लंडविरुद्धच्या टी -20 मालिकेत राहुलला खराब फॉर्मबद्दल बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला होता. शतक पूर्ण झाल्यानंतर राहुलने सर्व टीकाकारांना विशेष शैलीत शांत केले. राहुलने दोन्ही कानांवर हात ठेवला, याचा अर्थ तो बाहेरील टीकेकडे लक्ष देत नाही. अशाप्रकारे, राहुलने आपल्या फलंदाजीने टीकाकारांची बोलती बंद केली.
सामन्यात राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्या विकेट पडल्या तेव्हा भारताच्या केवळ 37 धावा झाल्या होत्या. यानंतर राहुलने कर्णधार विराट कोहली आणि त्यानंतर ऋषभ पंत या दोघांबरोबर शतकी भागीदारी करत टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणले.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…