Ind vs Eng 2nd ODI : India set 337 runs target for England
पुणे : भारताने इंग्लंडपुढे ३३७ धावांचा आव्हान ठेवलं आहे. केएल राहुलने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत दमदार शतक ठोकलं. कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने फलंदाजी करत ५० षटकात ६ बाद ३३६ धावा केल्या.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इयान मॉर्गन जखमी असल्यामुळे संघाबाहेर असून इंग्लंडचे कर्णधारपद जोस बटलरकडे देण्यात आले. भारतीय संघात श्रेयस अय्यर जखमी असल्यामुळे ऋषभ पंतला संधी दिली. भारतीय डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी केली. शिखर फक्त ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा देखील २५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. परंतु, विराट कोहली ६६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने फक्त २८ चेंडूत ५० धावा केल्या. राहुलने वनडेतील पाचवे शतक पूर्ण केले. त्याने ११४ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांसह ११४ धावा केल्या. पंत ४० चेंडूत ७७ धावा करून बाद झाला. त्याने ७ षटकार आणि ३ चौकार मारले.
दरम्यान विराटने वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येत सर्वात कमी डावात १० हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…