मुंबई : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांशी समेट होण्याची आशा बाळगून उद्धव ठाकरे यांनी काल पुन्हा बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले होते. मात्र, एकीकडे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आमच्यावर अतिशय गलिच्छ शब्दांत टीका करतात आणि दुसरीकडे तुम्ही आम्हाला परत येण्याचे आवाहन करता, याचा अर्थ काय? असे विचारले होते. इतर शिवसेना आमदारही संजय राऊत यांच्याकडून केल्या जाणाऱ्या टीकेवर नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत यांनी म्हटले की, ठीक आहे, मी आजपासून बोलायचं थांबतो. पण मी पक्षाची भूमिका आणि शिवसैनिक म्हणून कडवटपणे बोलत आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याची योजना आहे, त्याविरोधात बोलत आहे. आता याचा त्यांना त्रास होत असेल तर ठीक आहे. एकनाथ शिंदे हे माझे निकटचे सहकारी आहेत, मित्र आहेत. मी काय आहे हे त्यांना माहिती आहे आणि ते काय आहेत, हे मला माहिती आहे. आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतात, असे म्हणून चालणार नाही. हे चुकीचं आहे. आदित्य ठाकरे हे पक्षाचे नेते आहेत, शिवसैनिकांचा उद्रेक झालाय, आदित्य ठाकरे बोलणारच, असे संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत पुढे म्हणाले कि, “१६ आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील विषय सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना बहुमत चाचणी घेणे बेकायदेशीर आहे. याविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहोत. राज्यपालांनी जे विशेष अधिवेशन बोलावले आहे, ते कायद्याला धरून नाही. अनिल परब, अनिल देसाई आणि अरविंद सावंत आमची कायदेशीर बाजू सांभाळत आहेत. उद्या बंडखोर आमदारांना मुंबईत येऊ दे, मग बघू.”
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…