महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट, ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगा अशी मागणी

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक आमदारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. त्यांच्यासोबत आमदार चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी नेतेही होते. त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर फ्लोर टेस्टची मागणी केली.

मंगळवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला. राजभवनातून बाहेर आल्यानंतर फडणवीसांनी माध्यमांना माहिती दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यपालांना आज ईमेलद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून भाजपने पत्र दिलेलं आहे. या पत्रात राज्याची आताची परिस्थिती आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे. शिवसेनेचे ३९ आमदार बाहेर आहेत, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राहायचं नाही, असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. याचा साधा अर्थ आहे, ते ३९ आमदार सरकारसोबत नाहीत. त्यामुळे सरकारजवळ बहुमत राहिलेलं नाहीय. सरकारला बहुमत सिद्ध करायला लावावं, यासाठीचं पत्र आम्ही राज्यपालांना दिलेलं आहे.

या पत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा उल्लेख केला आहे. या पत्रावर राज्यपाल उचित निर्णय घेतील. मेजॉरिटी सिद्ध करण्यासाठी योग्य ते निर्देश देतील अशी अपेक्षा फडणवीसांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार असं भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर गेलं होतं.

आज देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी भाजपच्या महाराष्ट्र युनिटची कोअर कमिटीची बैठक पार पडली, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला गेले. दिल्लीत त्यांनी यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्याचे समजते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago