राजकारण

काँग्रेसशी हातमिळवणी करायला नको होती – माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी

बेंगलुरू : जनता दल सेक्युलर नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्यावर षडयंत्र केल्याचा आरोप करत म्हटले की त्यांचा इतका मोठा विश्वासघात भाजपानेही केला नव्हता. पुढे ते म्हणाले की ते जाळ्यात अडकले होते. काँग्रेसशी हातमिळवणी करून त्यांच्या पक्षाने राज्यातील जनतेचा १२ वर्षांचा विश्वास गमावला.

कुमारस्वामी म्हैसूर इथे बोलताना म्हणाले कि, ‘मी भाजपबरोबर चांगले संबंध ठेवले असते तर मी अजूनही मुख्यमंत्री असतो. मी २००६-०७मध्ये राज्यातील जनतेचा विश्वास जिंकला होता आणि तो १२ वर्षे कायम ठेवला होता, पण काँग्रेसशी हातमिळवणी करून मी तो गमावला.’ ते म्हणाले की त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करायला नको होती, ज्यांनी जनता दल सेक्युलरला भाजपाची बी टीम म्हणत प्रचार केला होता. पण पक्षाचे सर्वेसर्वा एच डी देवेगौडा यांच्या दबावामुळे ते ही आघाडी करण्यास तयार झाले. पुढे ते म्हणाले, ‘माझ्या पक्षाला ताकद गमावून याची किंमत द्यावी लागली. कुमारस्वामी यांनी स्पष्टीकरण दिलं की, ते देवेगौडा यांना दोष देत नाहीत, कारण ते धर्मनिरपेक्षतेची ओळख असलेल्या आपल्या वडिलांचा सन्मान करतात.

२०१८मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यानंतर राजकीय समीकरण बदलत एकमेकांविरोधात निवडणूक लढवलेले काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या दोन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले होते. सत्तास्थापनेनंतर कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. मात्र गेल्या वर्षी दोन्ही पक्षांनी एकत्र लोकसभा निवडणूक लढवली त्यानंतर युतीत मतभेद निर्माण झाले आणि काही आमदारांच्या बंडखोरीमुळे सरकार कोसळले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 दिवस ago

शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे तातडीने द्यावे – मंत्री संजय राठोड

मुंबई : जलसंधारण महामंडळ आणि शासन अंतर्गत प्रकल्पांच्या बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे तातडीने देण्याच्या सूचना…

3 दिवस ago

कामगारांना सक्तीची सेवानिवृत्ती देणाऱ्या कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करा, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश

मुंबई : नाशिक येथील बजाज इलेक्ट्रिक कंपनीतील ४१ कायमस्वरूपी कामगारांना व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता…

3 दिवस ago

बालगृहातील ७१५ बालके दहावीत उत्तीर्ण; मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अभिनंदन !

मुंबई : प्रतिकूल परि‍स्थितीवर मात करत बालगृहातील ७१५ विद्यार्थ्यांनी दहावीत यश संपादन करत सकारात्मक जीवनाचा…

3 दिवस ago

‘बार्टी’ कडून यूपीएससी-सीएपीएफ मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना २५ हजारांचे आर्थिक साहाय्य

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…

2 आठवडे ago

महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

2 आठवडे ago