will Nitish Kumar be the Chief Minister
बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल अशी चिन्हे आहेत. एनडीएने सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचं काय? हा प्रश्न आता विचारला जात आहे. भाजपा-जेडीयू आघाडीने सत्ता मिळवल्यानंतर नितीश कुमार मुख्यमंत्री होणार की नाही हे सर्वस्वी भाजपावर अवलंबून असेल. निवडणूक प्रचारात आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत असे भाजपाचे नेते म्हणत होते. पण बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर भाजपा मुख्यमंत्रीपद सोडेल का?
या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जेडीयूला फारशी कामगिरी करता आलेली नाही. याउलट भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल अशी चिन्हे आहेत, त्यामुळे नितीश कुमार यांचे मुख्यमंत्रीपद भाजपावर अवलंबून असेल. ‘ब्राण्ड नितीश’ला खिंडार पडलेले नाही, असे नितीश यांच्या जवळच्या नेतेमंडळींनी या निकालाचे वर्णन केले. ‘या निवडणुकीत मोदी यांच्या प्रतिमेने आम्हाला तारले’ तसेच “सरकार स्थापना आणि नेतृत्वासंदर्भात आज संध्याकाळपर्यंत आम्ही निर्णय घेऊ” असे भाजपाचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय म्हणाले. “जो कल आहे तसेच निकाल लागले तर नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील. आम्ही आमचा शब्द पाळू” असे विजयवर्गीय यांनी स्पष्ट केले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…