हरियाणा : हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील मांडोठी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामध्ये एका योग शिक्षकाला प्रेमसंबंधांच्या कारणातून त्याचा जीव गमवावा लागला. जगदीप झझ्जर नावाच्या योग शिक्षकाचे डिसेंबर महिन्यात अपहरण झाले होते. तीन महिने त्याचा शोध घेतल्यानंतर अखेर, २४ मार्च २०२५ रोजी, पोलिसांनी चरखी दादरी गावाजवळ सात फूट खोल खड्ड्यात त्याचा मृतदेह सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार, जगदीप झझ्जर रोहतकच्या मांडोठी गावचा रहिवासी होता, तो बाबा मस्तनाथ विद्यापीठात योग शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याचे अपहरण २४ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आले, त्यानंतर १० दिवसांनी त्याच्या अपहरणाची तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला, परंतु तो सापडत नव्हता. तीन महिन्यांनंतर २४ मार्च २०२५ रोजी, पोलिसांना त्याचा मृतदेह चरखी दादरी गावाजवळ सापडला. आरोपींनी त्याचे हात-पाय बांधून आणि तोंडावर पट्टी लावून त्याला जिवंत गाडलं होतं.
हत्येचे कारण
पोलीस तपासानुसार, जगदीपचे अपहरण आणि हत्या प्रेमसंबंधाच्या कारणातून झाली. जगदीप ज्या ठिकाणी भाडे तत्त्वावर राहत होता, तिथे एका महिलेशी त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. या महिलेच्या पतीला या संबंधांबद्दल समजल्यानंतर त्याने जगदीपला मारहाण केली आणि त्याच्या हत्येची योजना आखली. आरोपींनी बोअरवेलसाठी खड्डा खोदण्याचे कारण सांगत सात फूट खोल खड्डा खणला आणि त्याच खड्ड्यात त्यांनी जगदीपला जिवंत गाडले.
दोन आरोपींना अटक
या प्रकरणात पोलिसांनी हरीदप आणि धर्मपाल नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांचा आणि इतर काही साथीदारांचा सहभाग असल्याचा संशय आहे. पोलिसांनी फोन कॉल्सच्या तपासाद्वारे आरोपींना पकडले आणि तपास सुरू केला. पोलिस अधिकारी कुलदीप सिंह यांनी सांगितले की इतर दोन आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. शवविच्छेदन प्रक्रियेदरम्यान, मृतदेहाची ओळख निश्चित केली गेली आहे.
जगदीपच्या मृत्यूमुळे रोहतक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…