देश

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान वीर चक्राने सन्मानित

भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना त्यांच्या शौर्याबद्दल वीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा गौरव केला.

अभिनंदन यांना हा सन्मान दिला जात आहे कारण त्यांनी बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानचे F-16 लढाऊ विमान त्यांच्या मिग-21 बायसन लढाऊ विमानाने पाडले होते. मात्र यादरम्यान त्यांच्या जेटचेही नुकसान झाले. तेव्हा अभिनंदन पाकिस्तानच्या जमिनीवर पडले आणि त्यांना पाकिस्तानी सैन्याने पकडले होते.

सुमारे 60 तासांनंतर पाकिस्तानने त्यांना पुन्हा भारताच्या ताब्यात दिले. या 60 तासात पाकिस्तान भीतीच्या छायेत जगत होता. अभिनंदन यांच्यासाठी भारत आपल्यावर हल्ला करेल अशी भीती त्यांना वाटत होती. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी खुलासा केला होता की, भारताचे फायटर पायलट अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने भारताच्या भीतीमुळे सोडले होते. ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानच्या संसदेत हे वक्तव्य केले होते. अभिनंदन यांना सोडून देऊन पाकिस्तानला भारत आणि जगाला खूश करायचे होते, असे ते म्हणाले होते.

दुसरीकडे, पाकिस्तान विधानसभेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक म्हणाले होते की, अभिनंदन यांना पकडल्यानंतर पाकिस्तानला सतत भीती वाटत होती की भारत त्यांच्यावर हल्ला करेल. या हल्ल्याच्या भीतीने लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय थरथरत होते. चेहऱ्यावर घाम आला होता. बाजवा यांना भारताकडून हल्ल्याची भीती वाटत होती. एवढेच नाही तर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशीही हादरले होते. ते म्हणत होते की, अभिनंदनला सोडून द्या. रात्री ९ वाजेपर्यंत अभिनंदनला सोडले नाही तर भारत पाकिस्तानवर हल्ला करेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago