देश

गड आला पण.. ममता बॅनर्जींचा पराभव, जनतेचा कौल मान्य पण कोर्टात जाणार : ममता बॅनर्जी

कोलकाता : पश्चिम बंगालमधून भाजपचा मोठा पराभव झाला असला तरी ममता बॅनर्जी यांचा प्रभाव झाला आहे नंदीग्राम मधून भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा विजय झाला आहे. ममता बॅनर्जी यांचा भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी पराभव केल्याचं समजत आहे. पराभव झाल्याचं ममतांनी जवळजवळ मान्य केलं आहे. पण आपण कोर्टात जाणार असल्याचं ममता म्हणाल्या आहेत.

ममता बॅनर्जींच्या नेतृत्त्वातील तृणमूल काँग्रेसने मोठा विजय प्राप्त केला आहे. सध्या तृणमूल 215 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 75 जागांवर आघाडीवर आहे. बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमध्ये थेट लढत होती. या लढतीकडे सर्व देशाचे लक्ष लागले होते.

ममता बॅनर्जी म्हणाल्या कि, “मला निकाल मान्य आहे, पण आम्ही कोर्टात जाणार आहोत. मला अशी माहिती मिळत आहे कि निकाल जाहीर झाल्यानंतर काही फेरफार करण्यात आले आहेत. आम्ही त्यातील सत्य शोधणार आहोत आणि ते जनतेसमोर आणू.”  त्या पुढे बोलताने म्हटल्या कि नंदीग्रामबाबत काळजी करु नका. मी नंदीग्राममधून लढले कारण ही एक चळवळ होती. नंदीग्रामच्या लोकांना जो काही निर्णय द्यायचा आहे तो देऊ द्या. तो मला मान्य आहे. मला फरक पडत नाही. पण आम्ही जिंकलो आहोत आणि भाजपचा मोठा पराभव झाला आहे. भाजपने घाणेरडं राजकारण केलं. भाजप हरली आहे. निवडणूक आयोगाचा एकांगीपणा देखील आम्हाला यावेळी सहन करावा लागला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago