We are here to take back the black laws imposed on farmers - Former Union Minister Harsimrat Kaur Badal
माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आज भटिंडा येथील तख्त श्री दमदमा साहिब या गुरुद्वाराला भेट दिली, हरसिमरत कौर या शिरोमणी अकाली दलातर्फे होत असलेल्या शेतकरी विरोधी कायद्याविरोधातल्या आंदोलनाचं नेतृत्त्व करत आहेत, कृषि कायद्यांना विरोध दर्शवतच त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. इतकंच नाही तर शिरोमणी अकाली दल एनडीएतूनही बाहेर पडलं. आता आम्ही शेतकऱ्यांचा आवाज झालो आहोत असं वक्तव्य त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं.
शेतकऱ्यांवर लादण्यात आलेले काळे कायदे मागे घेण्यासाठी आम्ही त्यांचा आवाज झालो आहोत असं वक्तव्य शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी केलं आहे. “अकाली दलाने शेतकऱ्यांवर लादण्यात आलेले काळे कायदे मोदी सरकारतर्फे मागे घेतले जावेत म्हणून अपार संघर्ष केला. त्यासाठी आम्ही NDA मधून बाहेर पडलो, पदं सोडली, मोदी सरकारसोबत असलेले सौहार्दाचे संबंध तोडून टाकले. आता अकाली दल हा शेतकऱ्याचा आवाज झाला आहे आम्ही कायमच शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने आहोत” असं वक्तव्य हरसिमरत कौर यांनी केलं.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…