देश

वंदे भारत एक्सप्रेसला लागली आग, प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं…

नवी दिल्ली : भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कुरवई स्थानकाजवळील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून निजामुद्दीनला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या सी १४ या बोगीमध्ये आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक २०१७१ भोपाळ-हजरत निजामुद्दीन वंदे भारत पहाटे ५.४० वाजता निघाली. बीना स्टेशनच्या अलीकडेच आग लागली. आगीची माहिती मिळताच ट्रेन थांबवण्यात आली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बिना रेल्वे स्थानकापूर्वी कुरवाई केथोरा येथे गाडी थांबवण्यात आली आणि प्रवासी सुखरूप उतरले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

कुरवाई केथोरा स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्याच्या बॅटरी बॉक्समध्ये आग लागल्याचे भारतीय रेल्वेने सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेस नेते अजय सिंह, आयएएस अविनाश लावनिया यांच्यासह अनेकजण वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करत होते. या घटनेनंतर संपूर्ण वंदे भारत ट्रेन रिकामी करण्यात आली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago