देश

मोठी बातमी! न्यायालयाने चारधाम यात्रेवरील बंदी उठवली, दिले ‘हे’ निर्देश

उत्तराखंड : उत्तराखंड उच्च न्यायालयाने चारधाम यात्रेवरील बंदी उठवली आहे. तथापि, या काळात प्रवाशांना कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करावे लागेल. गुरुवारी सरन्यायाधीश न्यायमूर्ती आर एस चौहान आणि न्यायमूर्ती आलोक कुमार वर्मा यांच्या विभागीय खंडपीठाने प्रवासावरील बंदी उठवण्यासाठी सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने चारधाम यात्रेवरील बंदी उठवली आहे.

सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, राज्यातील कोरोना महामारी आता नियंत्रणात आहे, लोकांना कठोरतेने कोरोना नियमांचे पालन करायला लावले जात आहे. अशा परिस्थितीत प्रवासाला परवानगी दिली जाऊ शकते. तसेच, चारधाम यात्रा ही स्थानिक लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे.

असे असतील नियम :

  1. याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या एसओपीनुसार बद्रीनाथमध्ये दररोज येणाऱ्यांची संख्या 1200 वरून 1000 पर्यंत कमी केली. केदारनाथमध्ये 800, गंगोत्रीमध्ये 600 आणि यमुनोत्रीमध्ये 400 यात्रेकरूंना एका दिवसाच्या यात्रेची परवानगी देण्यात आली आहे.
  2. हेलिकॉप्टर आणि प्रवास मार्गावर सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्था या जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच काम करू शकतील.
  3. यात्रेसाठी आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल किंवा लसीच्या डोसचे प्रमाणपत्र आवश्यक असेल.
  4. भक्त कोणत्याही कुंडात स्नान करू शकणार नाहीत.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago