देश

ट्विटरने पुन्हा केली भारताच्या नकाशासोबत छेडछाड

नवी दिल्ली : ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. ट्विटरने यावेळी पुन्हा एकदा भारताचा चुकीचा नकाशा दाखवला आहे. सरकारशी संबंधित सूत्रांनी दावा केला आहे की ट्विटरने आपल्या वेबसाईटवर दाखविलेल्या भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखचा समावेश केलेला नाही. ट्विटरने जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र देश असल्याचं आपल्या वेबसाइटवर दाखवले असल्याचा आरोप आहे.

ट्विटरच्या करिअर पेजवर ट्वीप लाइफ विभागात जगाचा नकाशा आहे. येथून कंपनी हे दाखवते की संपूर्ण जगात ट्विटरची टीम आहे. मागील वर्षीही ट्विटरने भारताच्या नकाशासोबत छेडछाड केली होती. त्यावेळी लडाखला भारताचा भाग म्हणून दाखवले गेले नव्हते. मात्र, नंतर त्यात सुधारणा करण्यात आली होती.

सरकार आता ट्विटरच्या विरोधात उघडपणे बोलत असून रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरची भारताबद्दल दुटप्पी भूमिका असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा वाद पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. ट्विटरच्या करियर पेजवरील भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखचा समावेश नाही. म्हणजेच ते सीमेच्या बाहेर दर्शविलेले आहेत. सोशल मीडियावर लोक याबाबत टीका करीत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ट्विटरचे निवेदन आले नाही. परंतु, जर सरकारने ट्विटरला नोटीस पाठवली आणि त्यानंतरही ट्विटरने दुरुस्ती केली नाही तर आयटी कायद्याच्या कलम 69 अ अंतर्गत ट्विटरवर कारवाई केली जाऊ शकते.

थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

1 आठवडा ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

1 आठवडा ago

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे.…

1 आठवडा ago

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय

मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य…

1 आठवडा ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध सामंजस्य करार

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये…

3 आठवडे ago

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक…

4 आठवडे ago