The ICC has given BCCI till June 28 to decide on the hosting of the T20 World Cup
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने भारताऐवजी युएईमध्ये टी -20 विश्वचषक आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितले की ते लवकरच आयसीसीला याबाबत माहिती देणार आहेत. तथापि, अद्याप तारखांबाबत निर्णय झालेला नाही.
आयपीएल -14 च्या दुसर्या टप्प्यातील सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान युएईमध्ये होणार आहेत. आयपीएल संपल्यानंतर दोन दिवसानंतर म्हणजेच 17 ऑक्टोबरपासून टी -20 वर्ल्ड कप आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. तथापि, टी -20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकासंबंधी अंतिम निर्णय आयसीसीकडून घेतला जाणार आहे.
रिपोर्टनुसार, युएईमध्ये अबू धाबी, शारजाह आणि दुबई येथे टी -20 विश्वचषकातील सामने आयोजित केले जातील. त्याचबरोबर राऊंड 1 चे सामने ओमानमध्ये घेण्यात येतील. पहिल्या फेरीत आठ संघांमधील 12 सामने खेळवले जातील, त्यापैकी चार (प्रत्येक गटातील प्रथम दोन) सुपर 12 साठी पात्र ठरतील. या फेरीत बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान, पापुआ न्यू गिनी हे संघ खेळतील. त्यापैकी चार संघ पहिल्या आठ टी -20 आंतरराष्ट्रीय संघात सामील होतील आणि सुपर 12 मध्ये पोहोचतील.
त्याचबरोबर सुपर -12 मध्ये एकूण 30 सामने होणार आहेत, जे 24 ऑक्टोबरपासून सुरू होतील. त्यात 12 संघ दोन गटात विभागले जातील. त्यांचे सामने दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे खेळवले जातील. यानंतर दोन उपांत्य फेरी आणि अंतिम सामने खेळवले जातील.
कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या भीतीमुळे प्रत्येकाचे आरोग्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयची भारतात टी -२० विश्वचषक आयोजित करण्याची इच्छा होती, परंतु काही मुद्दे पुढे आले. मंडळाला भारत सरकारकडून करात सूट मिळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आयपीएल स्थगित झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय खेळाडू भारतात येणार नाहीत, अशी भीती बीसीसीआयने व्यक्त केली.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…