क्रीडा

BCCI ने घेतला मोठा निर्णय, युएईमध्ये होणार टी -20 विश्वचषकाचे आयोजन

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने भारताऐवजी युएईमध्ये टी -20 विश्वचषक आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितले की ते लवकरच आयसीसीला याबाबत माहिती देणार आहेत. तथापि, अद्याप तारखांबाबत निर्णय झालेला नाही.

आयपीएल -14 च्या दुसर्‍या टप्प्यातील सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान युएईमध्ये होणार आहेत. आयपीएल संपल्यानंतर दोन दिवसानंतर म्हणजेच 17 ऑक्टोबरपासून टी -20 वर्ल्ड कप आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. तथापि,  टी -20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकासंबंधी अंतिम निर्णय आयसीसीकडून घेतला जाणार आहे.

रिपोर्टनुसार, युएईमध्ये अबू धाबी, शारजाह आणि दुबई येथे टी -20 विश्वचषकातील सामने आयोजित केले जातील. त्याचबरोबर राऊंड 1 चे सामने ओमानमध्ये घेण्यात येतील. पहिल्या फेरीत आठ संघांमधील 12 सामने खेळवले जातील, त्यापैकी चार (प्रत्येक गटातील प्रथम दोन) सुपर 12 साठी पात्र ठरतील. या फेरीत बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान, पापुआ न्यू गिनी हे संघ खेळतील. त्यापैकी चार संघ पहिल्या आठ टी -20 आंतरराष्ट्रीय संघात सामील होतील आणि सुपर 12 मध्ये पोहोचतील.

त्याचबरोबर सुपर -12 मध्ये एकूण 30 सामने होणार आहेत, जे 24 ऑक्टोबरपासून सुरू होतील. त्यात 12 संघ दोन गटात विभागले जातील. त्यांचे सामने दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे खेळवले जातील. यानंतर दोन उपांत्य फेरी आणि अंतिम सामने खेळवले जातील.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या भीतीमुळे प्रत्येकाचे आरोग्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयची भारतात टी -२० विश्वचषक आयोजित करण्याची इच्छा होती, परंतु काही मुद्दे पुढे आले. मंडळाला भारत सरकारकडून करात सूट मिळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे आयपीएल स्थगित झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय खेळाडू भारतात येणार नाहीत, अशी भीती बीसीसीआयने व्यक्त केली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचे आकस्मिक निधन, चाहत्यांमध्ये शोककळा

मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…

3 दिवस ago

एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठी रितेश–जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…

3 दिवस ago

तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी; भाषा व कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर

मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…

3 दिवस ago

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…

4 दिवस ago

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

6 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

1 महिना ago