देश

ब्रेकिंग : नारनौल येथे मोठा रेल्वे अपघात, मालगाडी उलटून 39 डब्यांचे नुकसान

हरियाणाच्या नारनौल येथे एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. आज (१९ फेब्रुवारी) दुपारी रेल्वे अपघातात भिलवाराजवळ मालगाडी पलटली. या अपघातात सुमारे 39 डब्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, येथील रेल्वे ट्रॅकही तुटलेला आहे, परंतु अपघाताचे नक्की कारण अजून समजू शकलेले नाही. ही मालगाडी रेवाडी येथून फुलेराकडे जात होती,परंतु ती भिलवारा जवळील ट्रॅकवरून उतरून उलटली आहे.

रेल्वे अपघातामुळे सध्या या मार्गावरील गाड्यांची ये-जा थांबविण्यात आली आहे. मदतकार्य सुरू करण्यात आलं असून रेल्वे वाहतूक पथक व अन्य पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडीमध्ये एकूण ९० कंटेनर होते. अपघातानंतर हे कंटेनर सुमारे 50 मीटर खाली पडले. त्याचवेळी रेल्वे ट्रॅकही उखडला आहे. माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. मदतकार्य जलद गतीने सुरू आहे. सध्यातरी कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही. जुन्या रेल्वे रुळावरून मालगाडी येत होती. या ट्रॅकवर प्रवासी गाड्याही प्रवास करतात. अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासन रेल्वे लाइन दुरुस्त करून सेवा पूर्ववत करण्यात व्यस्त आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago