देश

टाइम्स ग्रुपच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे दुःखद निधन, पंतप्रधान मोदींसह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली…

नवी दिल्ली : टाइम्स ग्रुपच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे गुरुवारी (13 मे) राष्ट्रीय राजधानी दिल्लीत निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. कोरोनामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांचे गुरुवारी रात्री ९.३५ वाजता निधन झाले.

इंदू जैन आजीवन अध्यात्मिक साधक, अग्रणी समाजसेवा करणाऱ्या, कलेच्या संरक्षक आणि महिला हक्कांच्या समर्थक राहिल्या. त्यांच्या निधनाने शोक व्यक्त केला जात असून अनेक राजकारणी, उद्योगपती आणि अध्यात्मिक स्वामींकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांचे मित्र आणि प्रशंसक त्यांच्या बद्दल भरभरून बोलत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदू जैन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विट करत म्हटले कि, “टाईम्स ग्रुपच्या अध्यक्षा श्रीमती इंदू जैन जी यांच्या निधनाने दुःख झाले. त्या त्यांच्या समाजसेवा उपक्रमांबद्दल, भारताच्या प्रगतीबद्दलची त्यांची उत्कटता आणि त्यांची आपल्या संस्कृतीत असलेली खोल रुची या गोष्टींसाठी नेहमी स्मरणात राहतील. मला त्यांच्याबरोबरच्या झालेल्या भेटी आठवतात. त्यांच्या कुटूंबियांबद्दल संवेदना आहेत. ओम शांती.”

इंदू जैन यांनी सन 2000 मध्ये सतत विकास आणि परिवर्तनात्मक बदल या उद्दीष्टाने टाइम्स फाऊंडेशनची स्थापना केली. त्या त्या अध्यक्षा होत्या. ही भारतातील एक प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्था आहे जी सामुदायिक सेवा पुरवते. हे फाउंडेशन भूकंप, पूर, चक्रीवादळ आणि साथीच्या रोगांसारख्या आपत्ती निवारण कार्यांसाठी सामुदायिक सेवा आणि टाईम्स रिलीफ फंड चालविते.

महिला उद्योजक व व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी 1983 मध्ये स्थापन झालेल्या FICCI लेडीज ऑर्गनायझेशनच्या (एफएलओ) इंदू जैन संस्थापक अध्यक्ष होत्या. 1999 पासून त्या भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टच्या अध्यक्षा राहिल्या. ह्या ट्रस्टची स्थापना १९४४ साली त्यांचे सासरे साहू शांती प्रसाद जैन यांनी भारतीय भाषांना चालना देण्यासाठी स्थापित केला होता. ह्या ट्रस्टद्वारे प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. केंद्र सरकारने जानेवारी 2016 मध्ये इंदू जैन यांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश

ठाणे : ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश आलं आहे. ठाण्याची जागा शिवसेनाच…

4 दिवस ago

कचाकचा बटण दाबा प्रकरणात अजित पवारांना दिलासा, निवडणूक अधिकाऱ्यांकडून क्लीन चिट

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित 'मतासाठी निधी' या…

1 आठवडा ago

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले…

1 आठवडा ago

विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी घेतला मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

मुंबई, दि. 24 : जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि…

1 आठवडा ago

मुंबईसह महाराष्ट्राला मतदानाच्या टक्केवारीत अग्रस्थानी आणावे – राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्र सिंग गंगवार

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी वाढवून…

1 आठवडा ago

बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास…

मुंबई, दि. २४ : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास…

1 आठवडा ago