देश

दुचाकीला धक्का लागल्यामुळे दोघांनी केली 15 वर्षीय भाजीविक्रेत्याची निर्घृण हत्या

नवी दिल्ली : दिल्लीतील नोयडामध्ये अतिशय संतापजनक घटना घडली आहे. भाजीच्या हातगाडीचा दुचाकीला धक्का लागल्यामुळे दोन दुचाकीस्वारांनी 15 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी ग्रेट नोयडा परिसरातून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

हा मुलगा गरीब परिस्थितीमुळे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी भाजा विकण्याचे काम करत होता. तो भाजी विकण्यासाठी नेहमीप्रमाणे शहरात आला होता. यावेळी दोन दुचाकीस्वार ललित आणि आशिष भाजी खरेदी करण्यासाठी मुलाच्या भाजीच्या हातगाडीजवळ थांबले. यावेळी मुलाच्या हातगाडीचा धक्का दुचाकीला लागून दुचाकी खाली पडली. आपल्या गाडीला धक्का लागून गाडी खाली पडली, याचा राग अनावर होऊन दुचाकीस्वारांनी मुलाला मारहाण करायला सुरुवात केली. त्यांनी मुलाला बेदम मारहाण केली, त्याच्या डोक्याला एवढी गंभीर इजा झाली की हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर काही वेळातच मुलाचा मृत्यू झाला.

दरम्यान, घटनास्थळी अन्य भाजी विक्रेतेही होते. त्यांनी या आरोपींना रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु आरोपींनी या सगळ्याला न जुमानता 15 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केली. मुलाला जबर मारहाण करून त्यांनी तिथून पळ काढला. या मुलाच्या हत्येच्या आरोपावरुन दिल्ली पोलिसांनी ग्रेट नोयडा परिसरातून दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. दोन्ही आरोपींविरोधात आयपीसी कलम 304 (हत्येसाठी दोषी) , 323 (मारहाण करणे), 504 (जाणूनबुजून अपमान करणे) अशी कलमे लावली आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago