तेजस हे भारताचं पहिलं स्वदेशी लढाऊ विमान बनवणारी कंपनी एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडचा 15 टक्के भाग विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ऑफर फॉर सेलद्वारे कंपनीच्या या भागभांडवलाची विक्री होणार आहे. या माध्यमातून सरकारला 5 हजार कोटी रुपये मिळतील अशी शक्यता आहे.
ऑफरची फ्लोअर प्राईस कंपनीच्या 1001 रुपये प्रति इक्विटी शेअरवर निश्चित करण्यात आली आहे, जी सध्याच्या शेअर बाजाराच्या दराच्या तुलनेत सुमारे 15 टक्के कमी आहे. एचएएलने रेग्युलटरी फायलिंगमध्ये सांगितलं आहे की, “ऑफर फॉर सेल 27 आणि 28 ऑगस्टला स्टॉक एक्स्चेंजच्या वेगळ्या विण्डोवर असेल. ऑफर फॉर सेलअंतर्गत कंपनीचे प्रमोटर एक्स्चेंज फ्लॅटफॉर्मवर आपले शेअर विकून कंपनीतील आपली भागीदारी कमी करतात.
सरकारने 3,34,38,750 इक्विटी शेअर विकण्याचा प्रस्ताव मांडला आहे, ज्यात कंपनीचे 10 टक्के पेडअप शेअर कॅपिटल आहे, ज्यात अतिरिक्त 5 टक्के भागीदारी किंवा 1,67,19,375 इक्विटी शेअर विकण्याचा पर्याय आहे.
हिंदुस्तान एरॉनॉटिक्समध्ये सरकारची 89.97 टक्के भागीदारी आहे, जी मार्च 2018 मध्ये स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड होती. कंपनीच्या रेग्युलटरी फायलिंगमध्ये म्हटलं आहे की, “ऑफर साईजचा 20 टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि 25 टक्के म्युचल फंडसाठी आरक्षित असेल. एचएएल कंपनी बऱ्यापैकी आपल्या संशोधनावर अवलंबून आहे आणि हेच याचं वैशिष्ट्ये आहे. याशिवाय अनेक उत्पादनांच्या निर्मितीसाठी टेक्नोलॉजी ट्रान्सफर आणि लायसन्स अॅग्रिमेंटही करण्यात आलेलं आहे. ही कंपनी संरक्षण मंत्रालयाच्या कक्षेत येते.
उत्पादन मूल्याच्या दृष्टीने ही संरक्षण क्षेत्राची सर्वात मोठी सरकारी कंपनी आहे. एचएएल कंपनीला जून 2007 मध्ये नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाला होता. ही कंपनी अनेक प्रकारची संरक्षण उत्पादनं बनवते. याशिवाय उत्पादनाचं डिझाईन, डागडुजी, देखभाल इत्यादीचंही काम करते. याच्या उत्पादनाच्या यादीत विमान, हेलिकॉप्टर, एव्हिओनिक्स, अॅक्सेसरीज आणि एयरोस्पेस स्ट्रक्चरचा समावेश आहे. लढाऊ विमान तेजस, ध्रुव, चीता, चेतक, लेन्सर आणि रुद्रा हे याच कंपनीची उत्पादनं आहेत.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…