counting of votes for the Bihar Assembly elections
बिहार विधानसभा निवडणुकांची मतमोजणी चालू असताना निवडणूक आयोगाने सांगितले आहे की ही मोजणी रात्री उशिरापर्यंत चालू राहणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे २०१५च्या निवडणुकीच्या तुलनेत ६३% अधिक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे लावली असल्याने हा विलंब होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले, कोव्हिड-19च्या संकटामुळे मतदान केंद्रांची संख्या जवळपास ६३% नी वाढवण्यात आली होती आणि प्रत्येक केंद्रावरील मतदारांची संख्या १,५००वरून १,००० करण्यात आली होती. मतमोजणीच्या फेऱ्या या मतदान केंद्रांच्या संख्येवर अवलंबून असतात. मतमोजणी चालू झाल्यानंतर सर्व गोष्टी बदलतात. त्यामुळे एकूण आकडा सांगणे शक्य नसते.
त्यांनी सांगितले की साधारण ३.१ कोटी मतांची मोजणी होणे अद्याप बाकी आहे. कायद्यानुसार आज सकाळी ८ वाजेपर्यंत पोहोचलेली टपाली मते मोजणीसाठी घेतली जातात. त्याचप्रमाणे इथेही ती घेतली जातील. यासंबंधीची सर्व माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असेल.
बिहारमध्ये सत्तेवर असलेली रालोआ विरोधकांच्या तुलनेत राज्यातील एकूण २४३ जागांपैकी अर्ध्याहून अधिक जागांवर पुढे आहे आणि भाजपा त्यांचा मित्रपक्ष संयुक्त जनता दलपेक्षा पुढे जाताना दिसत आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…