देश

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबियांना द्यावी नुकसान भरपाई

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वपूर्ण निर्णय देत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश दिले आहेत. मात्र, ही भरपाई किती असावी याचा निर्णय सरकारलाच घ्यायचा आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कोविडशी संबंधित मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच जी प्रमाणपत्रे यापूर्वी दिली गेली आहेत ती दुरुस्त करण्यास सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले की कोविडमुळे मृत्यू झाल्यास चार लाख रुपयांची नुकसान भरपाई देता येणार नाही. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (NDMA) अशी व्यवस्था करण्यास सांगितले आहे की कमीतकमी नुकसानभरपाई तरी मिळू शकेल. दरम्यान, अनेक याचिकाकर्त्यांनी अपील केले होते की कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांना आपत्ती कायद्यांतर्गत चार लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी. या व्यतिरिक्त याचिकाकर्त्याद्वारे कोविड मृत्यू प्रमाणपत्राबाबतही याचिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. ज्यावर सुप्रीम कोर्टाने केंद्र व राज्य सरकारांकडून उत्तर मागवले होते.

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई देऊ शकत नाही, केंद्र सरकारने केले स्पष्ट

त्यानंतर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले होते की सरकार कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यास असमर्थ आहे. त्याऐवजी सरकारचे लक्ष आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर आहे. नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची भरपाई दिली जात आहे, परंतु साथीच्या काळात अशाप्रकारची नुकसान भरपाई देता येणार नाही.

आज झालेल्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले की कोविडमुळे मृत्यू झाल्यास चार लाख रुपयांची नुकसान भरपाई देता येणार नाही. परंतु, न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयातील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला भरपाईची रक्कम 6 आठवड्यांच्या आत निश्चित करण्याचे निर्देश दिले. कोर्टाने सांगितले की एनडीएमएने स्वत: निर्णय घ्यावा की किती रक्कम दिली जाऊ शकते, परंतु नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे.

भारतात कोरोना विषाणूचा कहर गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. या महामारीमुळे देशात आतापर्यंत सुमारे चार लाख लोकांचा बळी गेला आहे. त्यातच आता कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago