rahul Gandhi
शीख संत बाबा रामसिंग यांच्या आत्महत्येबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने “क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत” त्यांनी तातडीने तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत.
राहुल यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘करनालच्या संत बाबा रामसिंह यांनी कुंडलीच्या सीमेवर शेतकर्यांची अवस्था पाहून आत्महत्या केली. या दु: खाच्या घटनेत मी शोक व्यक्त करतो… बर्याच शेतकर्यांनी आपले बलिदान दिले. मोदी सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. इतके हट्टी होणे योग्य नाही. शेतकरी विरोधी कायदे मागे घ्या.’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या एका गुरुद्वारातील संत बाबा रामसिंग यांनी काल संध्याकाळी दिल्ली-सोनेपत सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला होता आणि आज त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आपल्या सुसाईड नोटमध्ये शेतकरी चळवळीबाबत सरकारची उदासीनता आणि त्यांना न्याय मिळत नाहीये यासाठी ते आपला जीव बळी देत आहे. पोलिसांनी सांगितले की मृताने पंजाबी भाषेत हस्तलिखित चिठ्ठीही ठेवली होती आणि त्यात म्हटले होते की, तो ‘शेतकर्यांचे दुःख’ सहन करू शकत नाही. पोलिस त्या चिठ्ठीचा तपास करत आहेत.
शेतकरी आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बुधवारी या खटल्याची सुनावणी करून सर्वोच्च न्यायालयाने संकेत दिले की, कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्ली सीमेवर आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकार यांच्यात होणारा वाद दूर करण्यासाठी ते एक समिती स्थापन करू शकतात. कारण लवकरच हा राष्ट्रीय मुद्दा बनू शकतो.
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…
मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे.…
मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य…
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये…
मुंबई : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक…