अंबाला हवाई तळावर पाच राफेल लढावू विमानं भारतीय वायुसेनेत औपचारिकरित्या सामील झाले. यावेळी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आपल्या भाषणात म्हणाले कि, ‘भारतानं नेहमीच वसुधैव कुटुंबकम म्हटलंय परंतु, सीमेवर कोणत्याही पद्धतीच्या दु:साहसाचं प्रत्यूत्तर देण्यासाठीही भारत तयार आहे. राफेलचा वायुदलातील सहभाग सीमा सुरक्षा आणि क्षेत्रीय अखंडता कायम राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.’
सीमेवर ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते पाहता राफेल हवाई दलात सामील होणं महत्त्वाचं आहे. राफेल गेम चेंजर आणि मल्टी रोल कॅपॅसिटीसोबत शत्रुला धडा शिकवण्यासाठी सक्षम असल्याचंही राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटलं. वायुसेनेनं आपण कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलंय. फॉरवर्ड सीमेवर तत्काळ विमानं तैनात करून शत्रुला स्पष्ट संदेश देण्यात आलाय. त्यामुळे आता कोणत्याही पद्धतीच्या हालचाली करण्यापूर्वी शत्रू अनेकदा विचार करेल, असं म्हणत त्यांनी वायुदलाचं कौतुक केलं.
फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यादेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. राफेलचा भारतीय वायुदलातील समावेश भारत आणि फ्रान्स दरम्यान असलेल्या दृढ संबंध दर्शवतो. भारत आणि फ्रान्स प्रदीर्घ काळापासून आर्थिक, सांस्कृतिक आणि राजनैतिकरित्या जोडला गेलाय. मजबूत लोकशाहीवर असलेला दृढ विश्वास आणि संपूर्ण जगात शांतीची आशा आमच्या आपांपासांतील संबंधांचा दुवा आहे, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…